दिवस कसे येतात कसे जातात आता समजत नाही ।
काही कामे जी महत्वपूर्ण असतात ते करावी लागतात ।
सकाळी ११ वाजेपर्यंत तिथे पोहोचयला हवे होते पण नंतर वेळ कळाले सकाळी ११ ते संध्याकाळी १२ पर्यंत ऑफिस चालू असते म्हणे । आता कसलं ऑफिस कसलं काय पुढं समजलंच।
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी निघालो मुले माझी भाची आणि भाचा ते दुसऱ्या शाळेत जाणार असून त्याच्या शाळेच्या दाखल्यावर सही आणि शिका घेण्यासाठी ठाणे येथील जिल्हा परिषद कार्यलयात जायचं होतं ।
साहेबांची सही आणि शिका घेण्यासाठी आम्ही गेलो असता मध्ये काही ठिकाणे लागली पण फोटो काढायला वेळ नाही भेटला पण पुढे गेलो आणि गूगल मॅप लावून त्या कार्यलय जवळ पोहोचलो ।
सकाळी निघतानाच माझा मित्र निरंजन हा ठाणे येथे राहत असल्यामुळे मी त्याला विचारले कार्यलय चालू असेल का पण तो थोडा लांब राहत असून त्याची ओळख असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला विचारले जो तिथे जवळ पास होता निरंजन ला नंतर मी पुन्हा फोन केला तेव्हा उत्तर भेटले हो कार्यालय चालू आहे ।
कोरोना मुळे कठीण आहे कोणते कार्यलय चालू कोणते बंद म्हणून अगोदर माहीत करून घेतलं नाहीतर थोडं कठीण झालं असते उगाचच फेरफटका नको आम्ही कल्याण आणि जाणे होते ठाणे आम्हाला जाण्याचे कारण आर्यन आणि अनन्य यांच्या शाळेच्या दाखल्यावर शिका आणि सही हवी होती म्हणून जायचं होतं आमच्याकडे वेळ ही नाही उद्याचा शेवटचा दिवस आहे नंतर आर्यन अनन्या दुसरी कडे पर्वा शिफ्ट होणार आहेत म्हणून आज आणि उद्या दिवस महत्वाचे आहेत ।
आज तर आम्ही जाऊन ही आमचं काम झाले नाही कारण सरकारी काम आणि ….. समजलेच असेल तुम्हला बरं हे आजच्या सारख उद्या नको होयला नाहीतर खूप कठीण होईल राव । आपल्या इकडे हाच प्रॉब्लेम आहे सरकारी कामच कुठले काम वेळेवर नसते होत ।
आज वेळेत गेलेलो ३ वाजता पोहोचलो पोहोचले असता कार्यालय मध्ये गेलो असता साहेब नाही भेटले त्याची मिटिंग चालू होती म्हणून ते बोले ५ वाजता या बरं एवढा वेळ आम्ही करायचं काय २ तास । एकतर पुन्हा घरी येऊ नाहीतर तिथेच उभा राहू आमचं काम ही महत्वपूर्ण होत आज आणि उद्या नाहीतर कधीच नाही म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला।
दोन तास घालवायचे म्हणून करायचे काय तर माझी एक बहीण ठाणे मध्ये राहते म्हणून तिथे जावं विचार केला तिला फोन केला असता ती पोलीस असल्याकारणाने ती ड्युटी वर होती आणि घरी ही कोण नव्हते म्हणून आम्ही आता करायचं काय म्हणून राहिलेली औषधे मेडिकल शोधत कोणत्या कोणत्या मेडिकल मध्ये जे औषधे आम्हाला हवी होती ती नव्हती भेटत मानून वेगवेगळ्या मेडिकल मधून औषधे घेतली।
नंतर अजून दीड तास घालवायचा म्हणून मी गाडी फिरवत फिरवत एकाजागी सावली मध्ये गाडी थांबवून भूक लागलेली म्हणून थोडे चिप्स आणि कुरकुरे खात वेळ घालवला नंतर थोड्या काही ठिकाणचे फोटो काढत होतो फिरलो
आवडले असेल तर follow करा मला असेच अजून फोटो तुम्हला बघायला भेटतील आणि मला ही प्रोसाहन भेटेल ।
आम्ही संध्याकाळी ५:१५ वाजता पुन्हा कार्यलय मध्ये गेलो असता तिथे थांबावं लागले पुन्हा आणि तिथून उत्तर भेटले अजून वेळ लागेल रात्री ७ ही वाजू शकतात । म्हणून आम्ही उद्या यायचं ठरवले एक काका होते त्याचा फोन नंबर तर घेतला आहे उद्या जाणार तेव्हा बघू काय होतंय उद्या तरी काम होईल का ।
म्हणून मला सरकारी कामे करणे म्हणजे कंटाळा म्हणून मला सरकारी कामे कधीच आवडत नाही कोणतं काम कधीच वेळेवर नाही होत त्यांना काय माहीत असते कोण कोण कोणत्या परिस्थिती मध्ये असतो कसा कसा येतो किती आशेने येतो की आपले काम लवकर होईल पण असा विचार करणे चुकीचं ।
बरं जास्त विचार न करता आम्ही परतीच्या प्रवासकडे वळालो आणि घरचा रस्ता पकडला आशा करतो जध्या तरी काम होईल मी पुन्हा उद्या यावर लिहीलच तो पर्यंत लेख आणि माझे फोटो कसे वाटले कंमेंट नक्की
करा
घरी जाताना कल्याण मध्ये पोहोचले असता काही फोटो मोबाईल च्या कॅमेरा मधून काढले । कल्याण दुर्गाडी किल्ले आणि जवळील खाडी आणि आजचा सूर्यस्थ ।
धन्यवाद मित्रांनो जर पोस्ट अवधली असेल तर जरूर कंमेंट्स मध्ये कळवा, फोटो कसे वाटले तेही नक्की सांगा पुन्हा एकदा खूप धन्यवाद