मन कविता

मन

मनवेडं बावरं माझ,
कल्पनेत रमुन जातो;
येशिल कधी स्वप्नी
प्रतिक्षेत एकटाच जागतो!
——————————————————————————————————————-
फोटो हा आताच आहे मनात खूप विचार चालू कधी चाबूक मारू विचार करतोय
मनाला पटेल तास करा सर्वच बोलतात पण मनाला कोण सांगणार त्याला पटत नाही
मन खेळ खेळत बसला इकडे जीवांची विकेट उडाली मनाला काय बोलू
कोणाच्या मनात आपण कसे ट्यून ते आपल्या मनात कसे यांचा विचार कधी तरी पडतो

——————————————————————————————————————–

मनात खूप काही ठरवलं पण तस काय झालं नाही ठरवलेलं तर मनाने मग का झाले नाही कस विचारणार
मनात आयुष्याच्या प्रश्नचा  घोळ झालाय मन काय एवढं हुशार का प्रश्न सोडून उत्तरं मिळवेल
मनावर हे पाणचट कविता नसेल आवडत तरी वाचता का मन सांगताय ना
मना ला किती सांगा चांगलं कधी ऐकत नाही वाईट लगेच ऐकतो
———————————————————————————————————-

 

आयुष्य चालू आहे
आयुष्य चालूच राहणार संपणार फक्त आपण जो वाचतोय आणि जो लिहतोय आयुश्याच्या पानावर सर्व प्रखरच लिखाण करायच चित्र देखील काडायचेत पण आपलं पुस्तक खराब न होता
 मन किती वेड

 

मन किती वेड

 

किती समजवल तरी

 

समजत नाही

 

त्याची धाव नेहमी तुझ्या कडेच |

 

तुझ्या शिवाय त्याला काही सुचत नाही

 

 

जग सुखी जीवनसाठी

 

देवा कड़े साकडे घालते

 

पण मी दररोज तुलाच मागते

 

तू सुखी राहव|

 

आपल्या दोघांच्या स्वपनातील

 

आंगन नेहमी किलबिलत राहाव

 

तुझ्या नावाने लावलेले

 

कुंकु जन्मभर माझ्या माथि

 

शोभाव|

 

आणखिन पण ह्या वेड्या

 

मनाच्या आशा आहेत खुप

 

 

कधी वाटते पदराची साउलि

 

करावी तुझ्या वर|

 

कधी वाटते तुझ्या समवेत

 

उंच आकाशी भरारी घ्यावी

 

कधी वाटते छोट मूल|||

 

होऊंन कुशीत झोपव

 

 

खरच मन किती वेड

 

असत ना

 

नुसती स्वप्न पाहत|

 

पण सत्य हे काय हे त्याला कधीच कळत नाही

 

ते आपल्या स्वप्नाच्या दुनियेत

 

मस्त असत

 

अस हे वेड मन|

 

प्रत्येका जवळ आहे !!!!

 

 

        दुर्गा वाड़ीकर

 

—————————————————————————————————-
 
काही कविता मनाला चिंता कडून घेतात मला हि कॉलेज च्या वेळी कविता आवडत होत्या कालांतराने बदल होत गेला वेळ कमी होऊ लागला नौकरी च्या मागे लागलो नौकरी मिळाली टिकवली पुन्हा गरज पडली गरज पुरवली लग्न होणार जिमदारी येणार पुन्हा म्हातारे होणार बघायला कोण नसणार काय कर्ण जीवन मन वेळ काळ सर्वानी गाजवलेला असतो तर कोण गाजवत असतो 
—————————————————————————————————-
 

 

You can’t have a relationship without any fights, but you can make your relationship worth the fight….
 एखाद्या घनदाट अरण्यात वाट चुकावी. आणि…
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि…
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच ‘जीवन’ म्हणतात.
—————————————————————————————————————–
 
जीवनात एवढ्याहि चुका करू नका
कि ……….
पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ……..
रबराला एवढाही वापरू नका कि
जीवनाच्या अगोदर कागत फाटून जाईल

 

 

 

 

 

 

 

——————————————————————————————————————————–
आशा ही निराशेची

 

 एकुलती एक सखी आहे

 

       आशा असते बोलकी

 

            निराशा मात्र “मुकी” आहे 

 

 
mianilshinde
———————————————————————————————-
 
सरलाय गंध
कळतोय मला
विटलाय रंग
दिसतोय मला
प्राणात माझ्या
घट्ट साकळला
जन्म माझा
सलतोय मला
कुणाची वाट मी
पाहतो कशाला
सरलाय दिन
अंधार उशाला
उत्तरे जहाल
हवी काळजाला
श्वास कोळश्याने
परी काजळला
येती तमातून
अर्थशून्य कळा
हाय जन्म तुझा
हाही वाया गेला

 

 

 

 

mianilshinde

 

 

 

 

————————————————————————————————————

 

निसर्गात फिरण्याची मज्जा काही औरच असते निसर्गाची हानी नका करू आणि जीवन असच जगात चला वेळ कोणासाठी नाही थांबत आता कोरोना वायरस आलाय माहित नव्हते असं होईल म्हणून जीवन जगत चला. 

 

—————————————————————————————
 

 

 

 आयुष्यात काय घेऊन आलो काय घेऊन जाणार , अहंकार , मी पण , गर्विष्ठ सोडून एकमेकांशी प्रेमाने राहून आयुष्याची मज्जा लुटत मिळून मिसळून दुसऱ्याला हि पुढे करत आपण हि पुढे होत जायचं

 

 

———————————————————————————————–
No. One understand my feelings…nw a days feel Alone..want achieve dream as soon as possible…
——————————————————————
सोडून चाललेली माणसं
डोंगरा आड गेलेला माणूस परत येतो.
ढगा आड गेलेला माणूस परत येत नाही.
का कोणास ठाऊक माणसं न सांगता भराभर सोडून चाललीत एकमेकांना .. कित्येक स्वप्न तशीच सोडून. ढगाआड !!
😢😢
माणूस गेल्यानंतर माणसं हळहळ करतात. पण हयात असताना हीच माणसं एकमेकांना छळतात.
सत्ता, संपत्ती, अहंकार, ईर्ष्या, स्पर्धा सगळं किती क्षणिक आहे याचा इतका अनुभव यापूर्वी कधी आला नसेल.
आपले प्राधान्यक्रम चुकले आहेत. एकमेकांत स्पर्धा करता करता जगण्याशी स्पर्धा झाली.
नको त्या गोष्टीना नको तितकं महत्व देणारी,
किरकोळ अहंकारासाठी एकमेकांना अगदी बोलणं सोडून देणारी माणसंच आहेत.
माणसाचा क्षणाचा भरवसा राहिला नाही.
फुलपाखरा सारखं क्षणभंगुर जगणं झालंय.
त्यामुळे माणूस माणसात असेपर्यंतच माणसांनी माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे.
मी का माघार घेऊ ?
मी का फोन करू ?
मी का कमीपणा घेऊ ?
हे सगळं सोडून आधार, धीर, आनंद दिला-घेतला पाहिजे.
माणूस गेल्यानंतर आपण त्याचं कितीही कौतुक केलं, स्टेटस ठेवलं, रडलो तरीही तो ते कधीच पाहू शकत नाही की त्याला कोणी सांगू ही शकत नाही…….
मित्रांनो, जिवंत पणी एकमेकांना प्रेम द्या, आधार द्या , मदत दया , हिंमत द्या , दिलासा द्या.. नात्याला महत्व द्या..
 गेल्यावर हळहळ करून उपयोग नाही..
 मग उरतात फक्त आठवणी 😷😷.
जाने कहा गये वो दिन 🙏
——————————————————————-

 

 

Leave a Comment